संप काळातील कर्मचाऱ्यांचा पगार कापणार
राज्य सरकारी निम सरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हे संप काळात सात दिवस गैरहजर राहिले असले तरी त्यांची सेवा खंडित येणार नाही;मात्र त्यांचा पगार कापला जाणार आहे.
या कालावधीत असाधारण रजा म्हणून धरल्याने त्यांना या दिवसांचा पगार मिळणार नाही.
संघटनांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले असून या निर्णयात बदल करण्याची मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांनी 14 मार्च ते 20 मार्च जुन्या पेन्शन साठी संप पुकारला होता.
या काळातील सेवा खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला
ही रजा असाधारण रजा म्हणून गृहीत धरण्याचा शासन निर्णय जारी केला
1977 साली 54 दिवसांचा विक्रमी संप केला होता.
त्यावेळी कर्मचारी अतिरिक्त काम केल्याने त्यांचा या दिवसाचा पगार कापला नव्हता.
आता पगार कापला जाणार असल्याने
संप मागे घेताना सरकारने दिलेल्या आश्वासनात विसंगती
असल्याचे शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे निमंत्रक
विश्वास काटकर यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांची शिल्लक रजा मंजूर करून सेवा नियमित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment