Tuesday, 3 September 2024

प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील तीन वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्त;अनुकंपावरील शिक्षकांसाठी नवे निर्देश

अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाही टीईटी अनिवार्य
शालेय शिक्षण विभागाचा निर्णय, पात्र ठरण्यासाठी तीन वर्षांची मुदत
राज्यात अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर काम करत असलेल्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तीन वर्षांत उत्तीर्ण व्हावे लागणार असून, पात्रता न मिळवल्यास संबंधित उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.
 शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध
केला.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) २३ ऑगस्ट २०१०च्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली.
त्यानुसार राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ आणि ६ मार्च २०१३ (शुद्धिपत्रक) रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली.
त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली.
२० जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयानुसार अनुकपा तत्त्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेतलेला निर्णय एनसीटीईच्या निर्णयाशी विसंगत आहे. त्यामुळे
अनुकंपा तत्त्वावरील,नव्याने
नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टीईटी
उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा
निर्णय घेण्यात आला.
या पार्श्वभूमीवर २० जानेवारी २०१६च्या शासन निर्णयातील
परिच्छेद ३मधील शिक्षक पात्रता परीक्षा,केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटींमधून सवलत राहील,हा मजकूर वगळण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच २०१६च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिलेल्या, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी दिलेल्या शिक्षकांपैकी जे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत, त्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
तर,अनुकंपा तत्त्वावर संस्थांनी नियुक्ती दिलेल्या,पण शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही,अशा उमेदवारांनाही तीन वर्षांत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीवर अनुकंपा
शालार्थ आयडी मान्यता द्यावी तीन वर्षात ते पूर्ण करू न शकल्यास उमेदवाराची सेवा समाप्त करावी
📖📖📖📖📖📖📖📖📖📖
⭕'तो' मजकूर वगळला
२० जानेवारी २०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ मधील शिक्षक पात्रता परीक्षा, केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटींमधून सवलत राहील हा मजकूर वगळण्यात आला आहे. २०१६च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळालेले, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मिळालेले शिक्षक, तसेच अनुकंपा तत्त्वावर संस्थांनी नियुक्ती दिलेले; पण मान्यतान दिलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली आहे. मात्र, त्यांची अनुकंपावरील नियुक्त्ती असल्याने इतर पदावर सामावून घेण्याची कार्यवाही प्राधिकाऱ्यांनी करावी.
यावेळी सेवाज्येष्ठता अंतिम क्रमांकावर राहील,असेही म्हटले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
शासन निर्णय -
अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेतः-

🍁१. शासन निर्णय दि.२०.०१.२०१६ मधील परिच्छेद क्र. ३ मधील "मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील" हा मजकूर वगळण्यात येत आहे.

🍁२.शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने, शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आला आहे,अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेले नाहीत,अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत धारण करावी.

🍁३.ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधीन दि.११.१०.२०२२ च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि, शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांना देखील ३ वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता/शालार्थ आयडी देण्यात यावा.

🍁४.तीन वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ही अर्हता धारण करु शकणार नाहीत, अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि, अशी नियुक्ती अनुकंपा धोरणानुसार झालेली असल्याने त्यांना इतर पदावर नियुक्ती देणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता, सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.

🍁०२.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९०२१८३७०८०३२१ असा आहे.
हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

No comments:

Post a Comment