अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला
ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे.
त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा (akshay shinde)अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. त्यातच,आता उल्हासनगर (ulhasnagar) येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारण,येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खोदण्यात आला असून येथे त्याच्या मृतदेहाचे दफन केले जाईल.
त्यामुळे, गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं लोकांनी समर्थन केलं.
तर, समाजातील काही विचारवंत, वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काऊंटर फेक असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तर, अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धावदेखील घेतली.
त्यातच, शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीने कबुली दर्शवण्यात आली होती.
त्यामुळे, दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून गेल्या 3 दिवसांपासून सुरू होतं,अखेर हा शोध संपला आहे.
अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला.
त्यानंतर,अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती.
याबाबत स्मशानभूमी बाहेर शिवसेनेने बॅनर सुद्धा लावला आहे.
तर दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना काही जागा सुचवल्या असून अजूनही जागेची निश्चिती मात्र झालेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा अंत्यविधी करण्यासाठी आता फक्त आजचा एकच दिवस उरला असून त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला अक्षय शिंदेचा अंत्यविधी करावा लागणार आहे.
त्यातच,आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील,कोर्टाचे आदेश---
यावर न्यायधीशांनी महत्त्वाचे आदेश दिले. सरकार तुम्हाला योग्य ते सहकार्य करेल. तसेच पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. यावर पुढील सुनावणी सोमवारी होईल, असे न्यायधीशांनी म्हटले. यानंतर आरोपीच्या वकिलांनी मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देऊ, त्यांनाही याप्रकरणातील सत्य समजलं पाहिजे,असा प्रश्न न्यायधीशांना विचारला.
त्यावर न्यायाधीशांनी सरकारला सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा.
उद्या जरी दफन करण्यात आले तर सोमवारी आम्हाला याबद्दलची माहिती द्या,असे आदेश दिले.
अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थित राहावे-
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा, असे न्यायालयाने म्हटले.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाईकांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे,अशी विनंती वेणेगावकर यांनी केली.
वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले.
तसेच त्याच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांततेत दफनविधी होईल याची खबरदारी घ्या, अशी सूचना देखील सरकारला केली.
उल्हासनगर मध्ये मृतदेह दफन करण्यास विरोध-
स्थानिक लोक,तृतीयपंथी अनेक महिला यांनी दफनविधी करण्यात विरोध केला आहे.
सकाळी पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा केला होता.
लोकांनी हाताने व फावड्याच्या साह्याने तो खड्डा बुजवला.
त्या ठिकाणी बॉडी पुरू नये यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते.
पोलिसांच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे
उल्हासनगर मध्ये तो बुजवलेला खड्डा पुन्हा पोलिसांनी खोदण्यास करण्यास सुरुवात केली.
यामध्ये अडथळांना स्थानिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यासोबतच त्या ठिकाणचा गेट सुद्धा बंद करण्यात आला आहे..
No comments:
Post a Comment