Wednesday, 19 July 2023

भयंकर दुर्घटना खालापूर येथे आख्या गावावर दरड कोसळली ६०जण ढिगार्‍याखाली अडकले;स्क्यू ऑपरेशन सुरू

BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती
रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. 
चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. 
हा दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे इथे असल्याची माहिती आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ९० % वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे, 
३० ते ३५ आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. 
या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. जवळपास ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. 
तर एका महिलेसह दोन लहान मुलांना वाचविण्यात बचाव कार्य पथकाला आतापर्यंत यश आले आहे. वर अजूनही माती पडत असल्याने बचावकार्य करणाऱ्यांनाही धोकाच निर्माण झाला आहे.

डीसी दत्तात्रय नवले आणि डीसी सर्जेराव सोनवणे यांना अनुक्रमे वैद्यकीय मदत आणि बचाव आणि निवारा व्यवस्था ऑपरेशन्ससाठी ओएसडी म्हणून नियुक्त केले आहे.
 घटनास्थळी चार रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. आरएच चौकात तालुका आरोग्य अधिकारी आणि चार डॉक्टरांसह चार रुग्णवाहिका सज्ज आहेत.

खाजगी डॉक्टरांचीही मदत THO ने बोलावली आहे.
एकूण ४० ते ४५ घरांची वाडी या दरडीखाली अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मात्र, प्रशासनाकडून ३० ते ३५ घरांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आहे. घटनास्थळी युद्ध पातळीवरती मदत पथक पोहोचली आहेत.
 मात्र, सोसाट्याचा वारा तसेच वरून अद्यापही काही दगड खाली येत आहेत. 
यामुळे बचाव पथकालाही धोका निर्माण झाला आहे. पण, जे अडकले आहेत त्यांना तातडीने रेस्क्यू करून वाचवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत.
तहसीलदार आयुब तांबोळी व त्यांचे प्रशासन या सगळ्या परिस्थिती लक्ष ठेवलं असून अनेक सामाजिक कार्य करणारे मदत पथक, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर, मंत्री दादा भुसे आणि आमदार महेश बदालीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

200 जण अडकले
एनडीआरएफची टीम, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच मदतकार्यास सुरुवात केली. पण पाऊस, धुकं आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास विलंब होत होता. 
तरीही या पथकांनी रात्रीपर्यंत जागून 25 जणांना बाहेर काढलं. त्यातील 21 जणांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. 
आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चिखल चिखल चिखल----
दरम्यान, दरडीसोबत मातीचा प्रचंड ढिगारा घरंगळत खाली आल्याने या गावातील घरे जमीनदोस्त झाले आहेत.
 ही संपूर्ण घरे मातीची होती. 
कच्ची घरे असल्यामुळे डोंगरकड्यामुळे ही घरे जमीनदोस्त झाली. 
त्यामुळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं. 
सर्वत्र चिखलच चिखल दिसत होता. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते.

आसपासच्या गावात दहशत----
ही दरड कोसळल्यामुळे शेजारीच मोरबे धरण असल्याने आसपासच्या गावात दहशत निर्माण झाली आहे. 
आता पहाट झाल्याने पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. 
दरम्यान, या घटनेमची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत.
श्री. अयुब रशिद तांबोळी
ईमेल : tahasil[dot]khalapur3[at]gmail[dot]com.
पदनाम : तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, खालापूर
दूरध्वनी : 02192-275048.
फॅक्स क्रमांक : 02192-275048.

No comments:

Post a Comment