Wednesday, 3 May 2023
प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वी अफजल खानाने त्याच्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला होता ही गोष्ट खरी आहे का?
प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वी अफजल खानाने त्याच्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला होता ही गोष्ट खरी आहे का?
हिंदू न्यूज पेपर आणि टाइम्स of India सारख्या पेपर ने या विषयी लिहाले आहे.
ब्रिटिश musium मध्ये पण या विषयी माहिती आणि जुन्या काळातील फोटो आहे.
शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे . अनेक ठिकाणी पुरावे नाहीत .महाराजांच्या कारकिर्दितील मधील 6 ते 8 वर्ष मधील पत्रव्यवहार मिळत नाही. या उमेदीच्य काळात महाराज स्वस्थ बसणे केवळ अशक्य.
वरील प्रश्नाचे मी एकदा उत्तर दिलेले. छत्रपती शिवाजी महाराज हे अफझलखानच्या बायकांच्या मृत्यूशी कसे निगडित होते? स्पष्ट कराल का? चे आशीष माळीने दिलेले उत्तर
ज्या अफझल खानाने शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना फसवून मारले ,त्याच अफझल खानाला स्वतःच्या 64 बायकांना स्वतःच्या हातानी माराव्या लागला ते पण अफझल खान चा गुरू आणि त्याला वाटत असणंरी शिवाजी महाराजची भीती कारणीभूत ठरले. आणि हे घडले प्रतापगडच्या युद्धा आधी आधी विजपुरात.
विजापूर -मध्ये-अथणी रस्त्यावर विजापूरपासून अगदी 7 कि.मी.वर एका निर्जन जागी एक विहीर असून तिला आज ‘खून बावडी’ म्हणतात.
३ मजल्यांची रचना असणारी खुनी बावडी सुबक पणे उभी आहे. काहींच्या म्हणण्यानुसार या विहिरीत अफझलखानाच्या या सर्व बायकांना ढकलून देण्यात आले तर काहींच्या मते क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एक पत्नी पळून जात होती. तिलाही पाठलाग करून ठार करण्यात आले. या सर्वांना त्याच ठिकाणी दफन करण्यात आले. त्यामुळे तेथे 64 कबरी असल्या तरी विजापुरात हा भाग ‘साठ कबर’ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनी हिंदुस्थानात पुरातत्त्व विभागाची स्थापना केली होती. त्या खात्याअंतर्गत इ.स. 1880 साली या खात्याचे प्रमुख हेन्री पुसेन्स यांनी संबंधित क्षेत्राची पाहणी करून साठ कबरींची माहिती फोटोसह संग्रहित केली होती. विशेष म्हणजे लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयात तो फोटो उपलब्ध आ
हे ठिकाण मराठा इतिहासाशी अप्रत्यक्षपणे नाते सांगते कारण हे ठिकाण "बुतशिकन, कुफ्रशिकन खान ए खानान - सिपेह सालार- अफजल खान "ह्या विजापूरच्या विख्यात सेनापतीशी संबंधित एक दुःखद आठवण बाळगून तिचा इतिहास सांगत आजही उभे आहे. .
विजापूरच्या आदिलशाही दरबारातील सर्वांत बलशाली सरदार म्हणून ज्याची ख्याती होती त्याचे नाव अफजलखान! खानाचे मूळ नाव अब्दुल्ला असून तो एका भटारणीचा मुलगा होता. संपूर्ण दक्षिण प्रांतात खानाची दहशत होती. अफझलखान किती पराकोटीचा अहंकारी होता याचा प्रत्यय त्याच्या शिक्क्यातून येतो. त्याने शिक्क्यावर लिहिले होते
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफझल
अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफझल अफझल
अर्थ : उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली, तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.*
अफजल खानासोबत शिवाजी महाराजांचे राजकीय वैरासोबतच वयक्तिक वैर सुद्धा होत. अफजल खानाविषयी आऊसाहेब जिजाऊंना आणि शिवाजी महाराजांना भयंकर संताप होता कारण एक म्हणजे शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांच्या मृत्यूलाही अफजल खान जवाबदार होता. त्याने छळ-कपट करून शिवाजी महाराजांच्या जेष्ठ बंधूंना ठार केले हिते. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाने शहाजी महाराजांना देखील बेड्या ठोकल्या होत्या, केवळ मुत्सद्दी पणामुळेच शाहजी राजे बचावले होते. अफजल खान अत्यंत क्रूर निर्दयी आणि स्वार्थी होता. . अफजल खान एक शायर आणि कवी सुध्दा होता. त्याला संस्कृत भाषेचही ज्ञान होत तो एक नंबरचा नास्तिक होता. त्याने पर्शियन भाषेत एक शेर लिहिला होता. त्याचा मराठी भाषेत असा अर्थ होतो, **जेव्हा कधी देवाला भीती वाटेल तेव्हा तो देव सुद्धा अफजल खान तू मला वाचव असे म्हणेल यातून त्याचा स्वतः विषयीचा महाभयंकर गर्व दिसून येईल.**
अफजल खान इतका क्रूर होता की त्याने कित्तेक लोकांना दगा फटका करून ठार केले होते. तो सत्ता धारण आणि राजकारणामध्ये प्रचंड क्रूर आणि स्वार्थी होता, पण स्वतः च्या जहागिरीतील लोकांनविषयी प्रचंड न्यायी, दयाळू आणि उदार हृदयाचा असल्याचा दाखवत होता. अफजल खानचा देवावर विश्वास नसला तरी शुभ-शकुन आणि भविष्य त्योतिष्य यांवर विश्वास होता
’शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून आदिलशहाला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम (उलिया जनावा ताज सुलताना) यांनी दरबारातील सरदारांना आव्हान देताच ही जबाबदारी अफजलखानाने आपल्या शिरावर घेतलेली होती.
अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते कारण ताकद, राजकीय बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम खानाच्याकडे होता.
शाही फर्माने आणि प्रचंड मोठी फौज घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली तेव्हा खानाने या स्वारीविषयी कौल मागताच ***त्याच्या गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले***, परंतु अफजलखानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबतीत आ***णखी एक दुःखद बातमी घडली. ती म्हणजे त्याच्या सैन्यदलातील झेंडय़ाचा हत्ती (ढालगज) फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला***. साहजिकच खानाच्या मनामध्ये शंकाकुशंका सुरू झाल्या. यावेळी खानाला 64 बायका असून आपल्या माघारी यांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर स्वभावाने मार्गी लावला.
.
अफजल खानाला ऐकून ६४ बायका होत्या. लढाई मध्ये चुकन आपला मृत्यू झाला. तर आपल्या बायका दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करतील ही कल्पना सुद्धा त्याला सहन झाली नाही. त्याने प्रताप गडावर शिवरायांच्या भेटीला येण्या पूर्वीच आपल्या सर्व बायकांना संपवण्याच्या निर्णय घेतला. त्या साठी त्याने विजापूर शहरापासून 7 किलोमीटर दूर असलेल्या एका निवांत जागेची निवड केली. त्या ठिकाणी त्याने ऐकून 64 कबरी खोदून घेतल्या त्या कबरीन पासून काही अनंतरावर पाण्याने भरलेली एक जुनाट विहीर होती. मोहिमेवर निघण्या अगोदरच त्याने आपल्या बायकांना पाण्यात बुडवून ठार केले आणि त्या कबरीनमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून 64 कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग साठकबरीया ह्या नावाने प्रसिद्ध आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने 18 जानेवारी 2013 रोजी याची दखल घेऊन याबाबत प्रसिद्धी दिली होती.
विजापुरात गेलो तर तिथं आदिलशहाची कबर तर शिवरायांचा पुतळा आहे. विजापुरात गोल घुमट, मुलुखमैदान तोफ, अनेक नामांकित वास्तू पाहताना त अगदी नापीक जमिनीच्या परिसरात एक चिरेबंदी विहीर असून त्याच्या शेजारी एका भव्य दगडी चबुतऱ्यावर शिस्तबद्ध पद्धतीने काळय़ा पाषाणात या 64 कबरी आजही पाहण्यास मिळतात. दक्षिण उत्तर बाजूने चबुतऱ्याची लांबी जास्त असून त्यानुसार पहिल्या दोन रांगेत 7-7 समाधी आहेत, तर तिसऱया रांगेत 5 व 11 समाधींच्या 4 रांगा आहेत. सध्या काही समाधी उद्ध्वस्त झालेल्या आहेत.
एकाच चबुतऱ्यावर 64 समाध्या पाहताना इतिहास माहीत असेल तर मन हेलावून जाते. साधारणपणे यातील 42 समाध्यांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्याच बाजूला खानाने स्वतःसाठी कबर बांधण्याची आज्ञा दिल्याचे म्हटले जाते, परंतु छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर खानाची कबर बांधली हा भाग वेगळा. स्मशानभूमीचा भाग वेगळा असेल, परंतु एकाच ठिकाणी एका रांगेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशा समाधी पाहण्यास मिळत नाहीत. ज्याला रक्तरंजित इतिहास आहे.
पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून ताब्यात घेतलेला आहे, मात्र तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे साठ कबरींची दुरवस्था व्हायला लागली आहे. विशेष म्हणजे खानाचे वंशज गुलबर्गा जिह्यातील अफजलपूरला राहतात. त्या ठिकाणी खानाने बांधलेली मशीद व इतर वास्तू पाहण्यास मिळतात. पाहण्याचा चष्मा बदलला की प्रत्येकाची दृष्टी बदलते. त्यामुळे तिथे खानाला संताची उपमा दिली तर नवल वाटायला नको. एकंदर या घटनेविषयी मतमतांतरे असली तरी विजापुरात गेल्यानंतर साठ कबरींचा इतिहास हा वास्तूच्या रूपाने आजही जिवंत आहे.
1]The last cries (The last cries)
2]On the outskirts of Bijapur, rest the 60 murdered wives of Adil Shah (On the outskirts of Bijapur, rest the 60 murdered wives of Adil
आंबा खाल्यानंतर लगेच सॉफ्टड्रिंक किंवा कोल्ड्रिंक्स पिल्यास मृत्यू होतो का?
आंबा खाल्ल्यावर कोल्डड्रिंक पिऊ नका ! काही प्रवासी चंडीगढ़ येथे फिरावयास गेले होते.
त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले.
त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुद्ध होऊ लागले.
स्त्रोत: गुगल विकी
उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले.
डॉक्टरांनी सांगितले,की आंबा खाल्ल्यानंतर कोणतेही कोल्डड्रिंक किंवा सॉफ्टड्रिंक पिऊ नये.
आंब्यातील सायट्रिक अॅसिड आणि कोल्डड्रिंकमधील कार्बनिक अॅसिड एकत्र मिसळल्यामुळे शरीरात विष तयार झाले.
कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत पोचवा. सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.” असे हा दावा सांगतो.
आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने चंदिगढ येथे फिरावयास गेलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला असे व्हायरल पोस्ट मध्ये म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही शोध घेतला.
व्हायरल पोस्ट मध्ये कुठले प्रवासी चंदीगढला गेले होते.
ते किती होते आणि त्यांचा कुठे मृत्यू झाला याबद्दल काहीही लिहिलेले नाही.
शिवाय डॉक्टरांनी सांगितले असा उल्लेख असला तरी डॉक्टरांचे नाव नमूद करण्यात आलेले नाही.
यासाठी आम्ही किवर्ड च्या माध्यमातून अशी कोणती घटना घडली आहे का?
याचा शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही.
चंदिगढ मध्ये अशी कोणतीही घटना घडल्याची माहिती देणारे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स किंवा बातम्या आम्हाला सापडल्या नाहीत.
आंबा आणि शीतपेयांच्या मिश्रणातून अथवा एकत्रित सेवनातून नेमके असे घडू शकते का?
याचा आम्ही तपास केला.
आम्हाला ने १७ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केलेला एक लेख सापडला. यामध्ये आंब्याचे रासायनिक गुणधर्म आम्हाला वाचायला मिळाले.
“आंब्यामध्ये मॅलिक आणि सायट्रिक ऍसिड सारखी सेंद्रिय ऍसिडस् असतात, जे आंब्याच्या फळांच्या आंबटपणाचे प्रमुख कारण आहेत.
त्यांनी सांगितले,”सिट्रिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड यामुळे शरीराला नुकसान पोहोचते.
या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.
असं केल्यावर काही लोकांना अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण लगेच त्यामुळे कोणाचा मृत्यू होणार नाही.”
आंबा खाल्ल्यानंतर लगेच शीतपेयांचे सेवन शरीरासाठी घातक आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नसल्याचे आम्हाला दिसून आले.
अशाप्रकारे आमच्या तपासात आंबा खाऊन शीतपेये पिल्यास मृत्यू होतो असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला आहे.
Tuesday, 2 May 2023
Monday, 1 May 2023
माझी शाळा माझे उपक्रम;Teachers Celebration-13
माझी शाळा माझे उपक्रम
01 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपण वर्षभर केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक Teachers Celebration-13 च्या माध्यमातून आज आपल्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक यांच्या वतीने पार पडला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून वर्षभरात नवनवीन उपक्रम,कार्यक्रम शिक्षक-पालक यांची भेट अथवा दिवाळी पहाट कार्यक्रम असो,
मुलांसाठी कला-क्रीडांगण अथवा मुलांसाठी बाह्य परीक्षांचे आयोजन असो.
या सर्व कार्यक्रमात पालक विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा.
यासाठी कित्येक दिवसापासून शिक्षकांचे नियोजन सुरू असते. यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव, कार्यक्रमाची ध्येय पूर्ण करण्याची तळमळ असते.
त्यामधून मिळणारा आनंद नव-नव्या कल्पनांना उजाळा देत असतात. अशाच या ध्येयवेड्या शिक्षकांसाठी आज Teachers Celebration-13 याचे आयोजन करण्यात आले होते.
एकाच दिवशी सर्वांचे वाढदिवस या उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करत असतो.
कारण वर्षभर प्रत्येक जण आपल्या शालेय कामकाजात व्यस्त असतो. सर्वजण एकाच वेळी अशा या कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही.
हा कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांचा आनंद द्विगुणीत करावा इतकाच आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे एकत्र येणे,नवीन संकल्पना, नवीन कल्पना मांडणे,विचारांची देवाण-घेवाण करणे येणाऱ्या नवीन वर्षासाठी नियोजन करणे.
या सर्व गोष्टी आनंदमय वातावरणात पार पडतात.
ज्या प्रकारे मुलांचे दुसरे आई-वडील शिक्षक असे म्हणतात.
त्याच प्रकारे समाजातील विविध घटकांना पुढे घेऊन जाण्याचे काम शिक्षक करत असतात अशा कार्यक्रमाने सर्व हेवे-दावे बाजूला करून विद्यार्थ्यांचे विकास जलद मार्गाने पूर्ण करता येतात.
शिक्षक हे केवळ पगारदार कर्मचारी नसतात........
शिक्षकाची भूमिका एखाद्या प्रशिक्षकासारखी असते जो आपल्या मुलांना ऑलिम्पिकसारख्या खडतर स्पर्धात्मक खेळासाठी तयार करतो. पण शिक्षकाला हेही माहीत आहे की या गेममध्ये प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचे नाही.
यापैकी बरेच जण चांगले प्रेक्षक बनवतील.
त्यापैकी काही लेखक होतील.
त्यांच्यामध्ये अशी मुले आहेत जी संगीताच्या विश्वात आपले नाव उज्ज्वल करतील तर अशी ही मुले आहेत जी शिक्षक बनण्याची आणि इतर मुलांची स्वप्ने पूर्ण करण्याची भूमिका स्वीकारतील.
म्हणजेच शक्यतेच्या दारापलीकडे जाणारा माणूस घडवण्याच्या भूमिकेत शिक्षक नेहमीच समर्पणाने गुंतलेला असतो, तो केवळ पगारदार नसतो.
शिक्षक हा केवळ पुरस्कार आणि दर्जा मिळविण्याचा आकांक्षी नसतो, तर तो खऱ्या अर्थाने दूरदर्शी असतो आणि भविष्य घडवण्यात आणि त्यात बदल करण्यात आपली भूमिका सहज ओळखतो.
कितीही अडचणी आल्या तरी तो या मार्गापासून कधीच पाठ फिरवत नाही.
कारण भविष्यातील अकल्पनीय आव्हानांसाठी अंधाराशी लढणाऱ्या पिढीला तयार करणे हे त्याचे काम आहे, ज्या आव्हानांचा तो फक्त अंदाज लावू शकतो.कारण ते भविष्याच्या कुंडात आहेत, म्हणून तो आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि त्यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करण्यास आणि जगण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करतो.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक नेते तयार करतात,अनुयायी नाहीत.
नेता होण्यासाठी आणि नेतृत्व कौशल्य शिकवण्यासाठी आपण स्वतः नेतृत्व करणे आवश्यक आहे.
यासारखे उपक्रम आपणही साजरे करावे.
जेणेकरून शिक्षकातील प्रेम-आनंद द्विगुणीत करता येईल व नवीन करण्याची प्रेरणा मिळेल.
राहुल दत्तात्रय म्हमाणे
प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
(RDM_SMS)
Subscribe to:
Comments (Atom)